Pm Kisan Pradhan Mantri Kisan Samman Nidhi :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना

 

Pm Kisan Pradhan Mantri Kisan Samman Nidhi yojna 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना

 

या योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांना शेतीसाठी वापरण्यासाठी दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. अलीकडेच, सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13 वा हप्ता जमा केला आहे. 2023 पासून ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली आहे, त्यांनाच हप्त्याची रक्कम दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.09-Jun-2023

अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली आहे.

 

१) २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते.

२) अट शिथिल केल्यामुळे राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत.

शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना 2023 राबविते. पीएम किसान सन्मान निधी योजना 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात तपासा.

पीएम किसान सन्मान निधी योजना 2023

योजनेचे नाव:- पीएम किसान सन्मान योजना

फुल फॉर्म:- पंतप्रधान पीएम किसान सन्मान निधी योजना

कधी सुरु झाली:- 24 फेब्रुवारी 2019

वार्षिक निधी रु. 6000

अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/

या योजने मागचा मुख्य उद्देश:- मोदी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वार्षिक रु. 6000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे.

लाभ – योजनेअंतर्गत गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना निधी देईल, ज्याचा वापर ते पीक उत्पादन वाढवण्यासाठी करू शकतील.

उद्दिष्ट :-

योजनेद्वारे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही कमी होईल.

आर्थिक सहाय्याची रक्कम :-

शेतकऱ्यांच्या हितासाठी 2023 च्या अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक 6000 आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. या योजनेतील 100% खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेत हस्तांतरित केले जातील. त्यासाठी शेतकऱ्यांना इकडे-तिकडे भटकावे लागणार नाही. सरकार पात्र, नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे हस्तांतरित करेल.

एकूण लाभार्थी :-

देशभरातील सुमारे 14.5 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्या बद्दल माहिती-

 

हे 6000 रुपये शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दिले जाणार आहेत. प्रत्येक टप्प्यात 2000 रुपये दिले जातील. म्हणजे शेतकऱ्याला सरकारकडून दरमहा 500 रुपये मिळतील.

सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी रु. 2000 चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-

१) आधार कार्ड अनिवार्य आहे.

२)मतदार ओळखपत्र,

३) ड्रायव्हिंग लायसन्स्

४) नरेगा कार्ड

यासारखी इतर ओळखपत्रे लाभार्थ्याला त्याची ओळख द्यावी लागेल

लाभार्थ्याने त्याचा बँक तपशील,

•खाते क्रमांक, IFSC कोड, तसेच बँक पासबुकची प्रत सादर करावी लागेल.

पहिल्या टप्प्यात:-

मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक नसून,

त्यानंतरच्या टप्प्यात ते देणे बंधनकारक आहे.

लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक मिळताच त्याला अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल, जेणेकरून ते डेटा अपडेट करू शकतील, जेणेकरून योजनेशी संबंधित सर्व माहिती मोबाईलवर वेळेवर मिळू शकेल.

पीएम किसान सन्मान निधी योजना अर्ज फॉर्म प्रक्रिया

मोदी सरकारने पीएम किसान सन्मान योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल (https://pmkisan.gov.in/) सुरू केले आहे. या पोर्टलवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचा डेटा अपलोड केला जाईल, त्या आधारे केंद्र सरकार सन्मान निधी पोर्टलवर शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करेल.

सर्वप्रथम, लाभार्थ्याने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला द्यावी.

पंतप्रधान किसान सन्मान निधी “साठी नोंदणी कशी करावी?

अशी कराल ऑनलाइन ekyc:

1) ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.

2) या वेबसाइटवर E-KYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

3) E-KYC च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.

4) यानंतर PM किसान सन्मान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

5) या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल

27 फेब्रुवारीला मिळाला होता 13 वा हप्ता :-

गेल्या वेळी 27 फेब्रुवारी रोजी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता जारी करण्यात आला होता. त्यामुळं केंद्र सरकारकडे 14 वा हप्ता जारी करण्यासाठी जुलै 2023 पर्यंत वेळ आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार 14 व्या हप्त्याचे पैसे जून ते जुलै दरम्यान कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवू शकते. याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये 14 वा हत्पा जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

14 वा हप्ता कधी जमा होणार:-

याची सध्या चर्चा सुरु आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात PM किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केली नाही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता जमा होणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी आधार कार्ड अपडेट केले नाही, त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

23 जूनपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन:-

ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नाही, त्या शेतकऱ्यांनी 23 जूनपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. जे शेतकरी आधीच किसान सन्मान निधी योजनेशी निगडीत आहेत आणि त्यांचे ईकेवायसी पूर्ण झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी पूर्तता करणं गरजेचं आहे. यासोबतच या योजनेत नुकतेच सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी देखील ई केवायसी करणे बंधनकारक आहे.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर:-

त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ प्रदान केला जात होता. आता सरकार द्वारे या प्रक्रियेमध्ये बदल केला आहे. या योजनेच्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी वारसांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर जर ते पात्र ठरतात तर त्यांना या योजनेच्या लाभ प्रदान केला जाईल. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर वारसांना एक प्रतिज्ञापत्र जमा करावे लागेल. हे प्रतिज्ञापत्र प्राप्त झाल्यानंतर वारसांच्या पात्रतेचे परीक्षण केले जाईल. जर वारस योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी पात्र असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

वारसांच्या प्रकरणात नामांतरणसाठी वारसांना महसूल निरीक्षकाची रिपोर्ट सादर करावी लागेल. हा रिपोर्ट वादग्रस्त नसावा. त्याचबरोबर वारसांकडे जमिनीचे अभिलेखही असले पाहिजे.

त्यांच्या कार्यक्षेत्राचे विवरण कृषि विभागाच्या अधिकारीद्वारा निर्धारित केले जाईल. त्याचबरोबर वारसांना मृत लाभार्थ्याची माहिती देण्याबरोबरच ही माहितीही द्यावी लागेल की, तो

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top