Pik Vima New Update : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आता शेतकऱ्यांना मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणार आहे. आता शासन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13 हजार रुपये देणार आहे.
यामध्ये 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यांसाठी पिक विमा हा मिळणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला प्रती हेक्टर 10 हजार ते 13 हजार 600 रुपये पर्यंत नुकसान भरपाई हे या मध्ये मिळणार आहे.
Pik Vima New Update
मित्रांनो, राज्यात मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले शेती पिकाचे नुकसान भरपाई साठी शासनाकडून 117 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो हा निधी 23 जिल्ह्यांसाठी देण्यात येणार आहे. चला तर पाहुयात त्या जिल्ह्यांची यादी.Pik Vima New Update
यामध्ये दिनांक 4 ते 8 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च यादरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मित्रांनो शासनाने याला अवकाळी पाऊस हा घोषित केलेला आहे. शेती पिकाचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढे क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढे क्षेत्र करिता विविध दराने अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.Pik Vima New Update
पात्र जिल्ह्यांची यादी पहा
Pik Vima New Update अमरावती जिल्ह्यातील 2663 शेतकऱ्यांना दोन कोटी 38 लाख 54 हजार रुपयांचे वाटप.
अकोला जिल्ह्यातील 3751 शेतकऱ्यांना 4 कोटी 49 लाख 96 हजार रुपयांचे वाटप.
यवतमाळ जिल्ह्यातील 9302 शेतकऱ्यांना 6 कोटी 91 लाख 33 हजार रुपयांची वाटप.
बुलढाणा जिल्ह्यातील 7944 शेतकऱ्यांना 7 कोटी 92 लाख 23 हजार रुपयांचे वाटप.
वाशिम जिल्ह्यातील 2572 शेतकऱ्यांना 2 कोटी 85 लाख 98 हजार रुपयांची वाटप.
नाशिक जिल्ह्यातील 22956 शेतकऱ्यांना 17 कोटी 36 लाख 36 हजार रुपयांचे वाटप.
धुळे जिल्ह्यातील 860 शेतकऱ्यांना 6 कोटी 75 लाख 98 हजार रुपयांचे वाटप.
नंदुरबार जिल्ह्यातील 8836 शेतकऱ्यांना 8 कोटी 13 लाख 23 हजार रुपयांचे वाटप.
जळगाव जिल्ह्यातील 18364 शेतकऱ्यांना 20 कोटी 42 लाख 61 हजार रुपयांचे वाटप.
अहमदनगर जिल्ह्यातील 11793 शेतकऱ्यांना 10 कोटी 41 लाख 59 हजार रुपयांची वाटप.
पुणे जिल्ह्यातील 1434 शेतकऱ्यांना 70 लाख 70 हजार रुपयांचे वाटप.
सातारा जिल्ह्यातील 1272 शेतकऱ्यांना 70 लाख 4 हजार रुपयांचे वाटप.
सांगली जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांची वाटप.
सोलापूर जिल्ह्यातील 3607 शेतकऱ्यांना 3 कोटी 92 लाख 82 हजार रुपयांची वाटप.
कोल्हापूर जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांना 1 लाख 14 हजार रुपयांचे वाटप.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 35015 शेतकऱ्यांना 22 कोटी 17 लाख 41 हजार रुपयांचे वाटप.
जालना जिल्ह्यातील 4215 शेतकऱ्यांना 3 कोटी 67 लाख 48 हजार रुपये वाटप.
परभणी जिल्ह्यातील 5999 शेतकऱ्यांना 4 कोटी 37 लाख 47 हजार रुपयांचे वाटप.
हिंगोली जिल्ह्यातील 6526 शेतकऱ्यांना 6 कोटी 4 लाख 49 हजार रुपयांचे वाटप.
नांदेड जिल्ह्यातील 36543 शेतकऱ्यांना 30 कोटी 52 लाख 13 हजार रुपयांची वाटप.
बीड जिल्ह्यातील 8503 शेतकऱ्यांना 5 कोटी 99 लाख 99 हजार रुपये वाटप.
लातूर जिल्ह्यातील 22565 शेतकऱ्यांना 10 कोटी 56 लाख 55 हजार रुपयांचे वाटप.
धाराशिव जिल्ह्यातील 2652 शेतकऱ्यांना 1 कोटी 39 लाख 27 हजार रुपयांचे वाटप.
तर शेतकरी बंधूंनो, या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्चमधील झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम प्रत्येक 13 हजार रुपये मिळणार आहे.
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.
धन्यवाद !