Swadhar Yojana.उच्च शिक्षणासाठी विध्यार्थ्यांना स्वाधार योजने चा आधार !बघूया काय आहे योजना आणि कसा मिळेल लाभ.
उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या बऱ्याच विध्यार्थ्यांना मर्यादित जागेमुळे शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना शहरातील खर्च परवडत नसल्यामुळे विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, म्हणून यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे.Swadhar Yojana
Swadhar Yojana
या योजनेतून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्या व जेवणाचा खर्च म्हणून प्रति विद्यार्थी 12 महिन्यासाठी 42 हजार इतकी रक्कम दिली जाते. इतर जिल्हा किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 12 महिन्यासाठी 60000 तसेच या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्य साठी देण्यात येते.Swadhar Yojana
विद्यार्थी पात्रता;
- विद्यार्थी स्थानिक नसावा.
- पालकाचे उत्पन्न २ लाख ५० हजार पेक्षा जास्त नसावे
- विद्यार्थी अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गाचा असावा
- विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था,ज्या ठिकाणी आहे,अशा ठिकाणचा तो रहिवाशी नसावा.
- दहावीनंतर आणि बारावीनंतर व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
आवश्यक कागदपत्रे
- १० वी आणि १२ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता १० वी मध्ये किमान 50 टक्के तर इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षाला किमान 50 टक्के गुण असावे.
- मान्यता प्राप्त विद्यालय व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्तेनुसार करण्यात येते.
- या योजनेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहतो.
- तसेच महत्त्वपूर्ण म्हणजे या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३% आरक्षण व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची किमान टक्केवारी ही 40 टक्के इतकी केलेली आहे.
त्वरित योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा